et cetera संबंधी

विषयाचं बंधन न ठेवता लिहायला हा ब्लॉग सुरू केलाय. इथे माहिती, आवडलेलं (इतरांचं) साहित्य, अघळपघळ असं काहीही असेल.

एन्क्रिप्शन

2:00 PM Edit This 1 Comment »
विवेके करावे कार्य साधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूडील भविष्यार्थी मन ।
हाटेचि नये ।
चालु नये असन्मार्गी ।
त्यता बाणल्या अंगी ।
घुवीरकृपा ते प्रसंगी ।
दासमहात्म्य वाढवी ।।
जनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।।
दिमाया मूळभवानी ।
हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी ।
इष्ट योजना करावी ।।

समर्थ रामदासस्वामींनी हे श्लोक पत्ररूपाने शिवाजी महाराजांना पाठवले होते. त्यात प्रत्येक ओळीतले पहिले अक्षर वाचल्यास "विजापूरचा सरदार निघाला आहे" असं वाक्य होतं. शेवटच्या दोन ओळींमध्ये काळजी घ्यावी असे सांगितले आहे. समर्थ रामदासस्वामींच्या प्रतिभेच्या अनेक कळसांपैकी हाही कळस शब्दातीत आहे. शिवथरघळ येथे हे उपलब्ध आहे. चंद्रशेखरकाका साने, यांच्यामुळे हे शब्द समजलेत. धन्यवाद सानेकाका.